शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

‘पर्यायी जमिनी’साठी अडले पुनर्वसन ! चारशे हेक्टर बुडीत : ४६७ प्रकल्पग्रस्तांना ३२७.४३ हेक्टर पर्यायी जमिनीची गरज, ‘स्वेच्छा’साठी शासनाकडून गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:27 IST

उत्तूर : धरणासाठी ४०० हेक्टर जमीन बुडीत होऊनही केवळ २५ टक्के धरणग्रस्तांनाच जमिनी मिळाल्या आहेत. उर्वरित ७५ टक्के टक्के धरणग्रस्त जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यायी जमीन पुरेशी

रवींद्र येसादे ।उत्तूर : धरणासाठी ४०० हेक्टर जमीन बुडीत होऊनही केवळ २५ टक्के धरणग्रस्तांनाच जमिनी मिळाल्या आहेत. उर्वरित ७५ टक्के टक्के धरणग्रस्त जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यायी जमीन पुरेशी उपलब्ध होत नाही म्हणून आर्थिक पुनर्वसन मोबदला (स्वेच्छा) घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला जमीनच हवी, अशी भूमिका धरणग्रस्त मांडत आहेत.

एकूण ८२२ प्रकल्पग्रस्तांपैकी ३५५ जणांनी स्वेच्छा, तर ३३४ प्रकल्पग्रस्तांना २४८.०९ हेक्टर आर जमीन अद्याप देय आहे.उत्तूर येथील ४६ प्रकल्पग्रस्त असून, २४ जणांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतलेले आहे. १६ जणांना ९.५३ हे. आर जीमन देय आहे, तर सहाजणांना जमिनी वाटप झाल्या आहेत. आर्दाळ येथे २४० प्रकल्पग्रस्त असून, १०४ जणांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतले आहे. ७८ प्रकल्पग्रस्तांना ५९.८८ हे. जमीन देय आहे. ५८ जणांना २९.०५ हे. जमीन वाटप झाले आहे.

वडकशिवाले येथील ४५ प्रकल्पग्रस्तांपैकी २८ जणांनी स्वेच्छा, तर १७ जणांना १२.२२. हेक्टर जमीन देय आहे. महागोंड येथील २६ प्रकल्पग्रस्तांपैकी सातजणांनी स्वेच्छा, तर १९ प्रकल्पग्रस्तांना १२.२१. हेक्टर जमीन देय आहे. हालेवाडीतील १५९ प्रकल्पग्रस्तांपैकी ६६ जणांनी स्वेच्छा, तर ९३ जणांना ७३.०० हेक्टर जमीन देय आहे.करपेवाडी येथील १५४ प्रकल्पग्रस्तापैकी ५९ जणांनी स्वेच्छा, तर २६ जणांना ३१.११ हेक्टर जमीन देय आहे. ६९ जणांना ३८.० हेक्टर जमीन वाटप झाले आहे. होन्याळी येथील १५२ प्रकल्पग्रस्तांपैकी ६७ जणांनी स्वेच्छा, तर ८५ जणांना ६३.४० जणांना जमीन देय आहे.

पुनर्वसनासाठी आजरा तालुक्यातील उत्तूर, मुमेवाडी, करपेवाडी, चव्हाणवाडी, होन्याळी, महागोंड, वडकशिवाले, पेंढारवाडी, आर्दाळ येथील जमिनी संपादित केल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पूर, कडगाव, लिंगनूर, अत्याळ, करंबळी, गिजवणे येथील जमिनी संपादित केल्या आहेत. यापैकी १७५.२ हेक्टर जमीन देय आहे त्याचे निवाडे जाहीर झालेत. त्यातील १३५.४३ क्षेत्रावर कब्जा घेतला आहे. ७२.६१. हेक्टर जमिनींचे वाटप झाले आहे. ५८.१० हे जमिनींना संबंधितांनी कोर्टातून स्थगिती मिळविली आहे. ४४.४९ हे जमिनींचे वाटप झालेले नाही.

जिल्हाधिकारी यांचे नावे असणाºया जमिनी पाहावयास गेले असता मूळमालक ताबा देत नाही. पोलीस यंत्रणा फारशी दखल घेत नाही. केवळ बैठका होतात. ठोस निर्णय काही नाही. आम्ही प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, आता आम्हाला वाली कोण? अशी विचारणा प्रकल्पग्रस्त करीत आहेत.बाबा, मुश्रीफ आणि आता दादा !युती शासनाच्या काळात सुरू झालेला प्रकल्प वेगवेगळ्या कारणाने रखडला. तत्कालीन सहकार राज्यमंत्री स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्पाचे पन्नास टक्के काम झाले. विधानसभा पुनर्रचनेनंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रकल्पाचे काम ७० टक्क्ंयापर्यंत नेले. विस्थापितांच्या प्रश्नासाठी बैठका घेऊन काही प्रश्न सुटले . आता १०० टक्के काम व पुर्नवसन करण्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर राहणार आहे.

गेली वीस वर्ष धरण रखडले, मोर्चे, आंदोलने, धरणाचे काम बंद पाडणे असे अनेक प्रकार झाले. तरी हा गुंता सुटला नाही. जमीन वाटपाचा आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वडकशिवाले येथील कार्यक्रमात दिला. मात्र, अजून जमीन जिल्हाधिकारी यांच्याच नावे आहे. वीस वर्ष हेलपाटे मारण्याशिवाय काही नाही. सरकारला विंनती आहे. आता धरण नको, आमची हक्काची जमीन तरी द्या. आमचं आयुष्य संपत चाललयं. आमच्या मुलांचं काय? याचा विचार शासन करणार का ?- महादेव खाडे, धरणग्रस्त (होन्याळी ) .

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर